प्रतिनिधी -संतोष उकिरडे
ऐन दिवाळीच्या तोंडावरती पुढाऱ्यांना फुटणार घाम.
१० नोव्हेंबरला होणार रास्ता रोको आंदोलन.
शिरूर : शिरूर तालुक्यातील बारा गावांना "शेतीसाठी धरणाचे पाणी द्या" या प्रश्नासाठी बारा गावातील ग्रामस्थ एकवटले.खूप दिवसापासून शेतीला पाणी हा प्रश्न प्रलंबित आहे.खासदार मा. अमोल कोल्हे,आमदार मा. दिलीपराव वळसे पाटील,मा.खासदार आढळराव पाटील यांच्यासोबत चर्चा आणि निवेदन देऊन सुद्धा शेतीला पाणी या विषयावरती तोडगा न निघल्यामुळे बारा गावातील सर्व ग्रामस्थांनी पाबळ गावामध्ये पाबळ चौकात १० नोव्हेंबरला सकाळी अकरा ११ वाजता रास्ता रोको करण्याचा पवित्रा घेतला आहे. बारा गावातील ग्रामस्थ व समिती मधील समन्वयक यांच्या सोबत प्रसारमाध्यमाशी बोलताना असे सांगितले की रास्ता रोको आंदोलन झाल्यावरती २१ नोव्हेंबरला केंदूर गावठाण मध्ये साखळी उपोषण करून आंदोलन करण्यात येणार आहे आणि यामध्ये सरकारने दखल न घेतल्यास १ डिसेंबरला अमर उपोषण मेसाई मंदिर कान्हुर मेसाई मध्ये करण्याचा इशारा देखील दिला आहे.शेतीला पाणी हे आंदोलन खूप तीव्र स्वरूपात होणार असल्याचे सांगितले जाते. या बारा गावातील पाणी प्रश्नासाठी बारा गावातील सरपंच सुद्धा यामध्ये सहभागी असून
बारा गावचा पाणी प्रश्नासाठी बारा गावातील बारा सरपंच एकत्र आले आहे. तसेच बारा गावांचा पाणी प्रश्न हा आंदोलन माध्यमातून मांडणार असे बारा गावातील ग्रामस्थ यांनी सांगितले आहे.
0 टिप्पण्या