बोअर पाडणे आणि टॅंकर साठी प्रस्ताव देण्याची मागणी
प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली माळखांबी गावचे ग्रामसेवक श्री अनंत गीते यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने निवेदन देवून हुंबे गल्ली,भवानी नगर मध्ये बोअर कनेक्शन पाडून देणेबाबत निवेदन देण्यात आले.यावेळी माळशिरस तालुका उपाध्यक्ष बिभीषण साठे,माढा विधानसभा उपाध्यक्ष समाधान साठे.सतीश साठे,महादेव साठे,मारुती साठे,लिमराज सकट.विजय सावंत इत्यादी उपस्थित होते.
ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या हुंबे गल्ली आणि भवानी नगर येथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरावे लागते आहे,त्यामुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्यासाठी तात्काळ आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने हुंबे गल्ली येथे एक आणि भवानी नगर परिसरात दोन कनेक्शन देण्यात यावीत.अन्यथा ग्रामपंचायतवर ग्रामस्थांना बरोबर घेवून भव्य मोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी.तसेच गावातील पाणी टंचाईची माहिती घेवून गावात पाण्याचा टॅंकर चालू करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत मधून पंचायत समितीला प्रस्ताव सादर करण्यात यावा.अशी मागणी करून निवेदनावर तात्काळ कार्यवाही न केल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळ खांबी ग्रामपंचायत ला दिला आहे.
0 टिप्पण्या