नुकसानग्रस्तांना तात्काळ मदतीची कार्यवाही करण्याची मागणी
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी समक्ष भेटून निवेदन देवून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आदेश द्यावेत तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.सोलापूर जिल्ह्यात चक्री वादळाने आणि अवकाळी पावसाने शेतकरी,व्यवसायिक,गोरगरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत असे निवेदनात नमूद केले आहे.
प्रामुख्याने माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्याने गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत नातेपुते येथील व्यावसायिक यांचे जवळपास पन्नास लाख रुपयांचे तर इतरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे,तसेच शेतकऱ्यांच्या केळी व इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे,तरी आपण माळशिरस तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी व पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याची मागणी पक्षप्रमुख किरण साठे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे. पंचनामे सुरु करण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी साठे यांना माहिती दिली.
0 टिप्पण्या