ग्रामपंचायत मळद या गावचे सरपंच हे अतिशय गरीब कुटुंबातील असून ,घरातील आई - वडील ,भाऊ हे अजूनही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सरपंच हे अतिशय समजूतदार व चांगल्या प्रकारे ग्रामस्थांची कार्य पार पाडून कोणाचीही गैरसोय होनार नाही याची काळजी घेतात.
गाव विकासाच्या कामासाठी सतत तळमळ करणे. सतत कोणत्या ना कोणत्या योजना गावात कशा येतील याविषयी धडपड करुन त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी भेटून कार्य पार पडणे. परंतु काही राजकीय लोकांना ते गरीब घरातील असल्यामुळे ते आपल्या अंतर्गत काम करावे, आपण म्हणावे तसेच त्यांनी कार्य करावे , या सर्व गोष्टी त्यांच्या मनासारखे न झाल्यामुळे त्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली. तरी ही त्यांनी संयमाने सर्व गोष्टींचे पालन केले.
काही गोष्टी साध्य होत नाहीत म्हणुन शेवटी राजकीय कूटनीति कार्यकर्त्यांनी मा. उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब यांना बेनामी अर्ज करून पूर्णपणे बदनामी करण्याचे प्रयत्न केले. कारण त्यांना ई-टेंडर द्वारे आपला मोबदला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या घ्यायचा होता. म्हणून त्यांनी बेनामी पद्धतीने अर्ज करून फ्लॅश केलेले टेंडर रद्द करण्यात अर्ज केले.
टेंडर फ्लॅश करणे हे केवळ
१. सरपंच/उपसरपंच
२. ग्रामसेवक
यांच्या कि नेच होतात. गाव विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण त्या गोष्टीचा पण वेगळ्या स्वरूपामध्ये मांडणी करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
0 टिप्पण्या