शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील बारा गावचा प्रलंबित प्रश्न कॅनलचे पाणी शेतीला हवे यासाठी बारा गावातील ग्रामस्थ एकवटले. कॅनॉलचे पाणी गावाजवळ काही अंतरावर जाऊन सुद्धा त्याचा फायदा तेथील शेतकऱ्यांना होत नाही. यासंबंधी आमदार दिलीपराव वळसे पाटील,मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,खासदार अमोल कोल्हे यांना ग्रामस्थांनी निवेदन देऊन यांच्या समवेत चर्चा ही केली पण यावर त्यांच्याकडून नुसते आश्वासन देण्यात आले. नुसते आश्वासन व तोडगा न निघाल्यामुळे ग्रामस्थ नाराज आहे.दुष्काळग्रस्त पाणी हक्क संघर्ष समिती यांनी उद्या रविवार दिनांक २९/१०/२०२३ रोजी केंदूर ग्रामपंचायत ठिकाणी तातडीची बैठक बोलावली.या बैठकीमध्ये कॅनॉल पाणी शेतीला आणण्याबाबत आंदोलन आणि उपोषण करण्याची चर्चा होणार आहे असे समितीने सांगितले.भविष्यात बारागाव चे तीव्र आंदोलन व उपोषण झाल्यास पुढिल काळात पंचायत समिती,आमदार, खासदार निवडणुकीवर खूप परिणाम होणार असल्याचे बोलले जाते. यामुळे कुठेतरी बारा गावातील शेतकऱ्यांचा विचार करावा आणि त्यांना शेतीसाठी कॅनॉलचे पाणी द्यावे अशी मागणी दुष्काळग्रस्त पाणी हक्क संघर्ष समिती करत आहे.
0 टिप्पण्या