इंदापूर ते अकलूज श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या रस्त्याच्या कामामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले असून या मटेरियलमुळे रस्त्याचे काम गुणवत्ताहीन झाल्याचे दिसून येत आहे, रस्त्यावरती ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत त्यामुळे या कामांमध्ये संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांचे साटेलोते आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात असून या रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्यात यावी आणि चौकशी अंती दोशी आढळणाऱ्या आणि शासनाचे निकष पूर्ण न करता काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावरती काळ्या यादी मध्ये टाकण्याची कारवाई करून ज्या अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली या रस्त्याचे काम करण्यात आले आणि चालू आहे त्या संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि रस्त्याच्या कामामध्ये अनियमितता आढळल्यास झालेला संपूर्ण खर्च ठेकेदार आणि जबाबदार अधिकारी यांच्याकडून वसूल करण्यात यावा तसेच या रस्त्याच्या बाजूला करण्यात येणारे ड्रेनेजचे काम सुद्धा गुणवत्तापूर्ण करण्यात आलेले नसून त्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात नियमित्ता असल्याची सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी उच्चस्तरीय समितीकडून करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दिनांक 27/06/2024 रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी..असा इशारा महाराष्ट्र विकास सेनेचे राज्य सरचिटणीस अविराज माने यांनी दिला आहे
0 टिप्पण्या