अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या च्या नातेवाईकाला २० लाखांची मदत द्या
प्रतिनिधी : : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात सोलापूर जिल्हा सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथील अपघातात मृत्यू पावलेल्याच्या नातेवाईक व जखमींना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य धनाजी कांबळे,सांगोला तालुका प्रवक्ते रोहन पाटील उपस्थित होते.
पंढरपूर-कराड रस्त्यावर सांगोला तालुक्यातील चिकमहूदजवळ मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास शेतात मजुरीचे काम आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहात रस्त्याच्या कडे थांबलेल्या महिला शेतमजुरांना भरधाव वेगातील १४ चाकी माल गाडीची जोराची धडक बसून घडलेल्या भीषण अपघातात सहा महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.अश्विनी शंकर सोनार, इंदुबाई बाबा इरकर,कमल यलाप्पा बंडगर,सुलोचना रामचंद्र भोसले, श्रीमंती सदाशिव माने, भिमाबाई जाधव यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. मनीषा आदिनाथ पंडित,सिंधुबाई रघुनाथ खरात,मीताबाई दत्तात्रय बंडगर या महिलाचा जखमींमध्ये समावेश आहे.मृत्यू झालेल्या महिलांच्या नातेवाईक यांना सरकारकडून २०लाख रुपयांची तर जखमींना १० लाख रुपयांची तात्काळ मदत करण्यात यावी.तसेच गाडी चालकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी मागणी केली आहे.
0 टिप्पण्या