पुरवठा विभागामध्ये मागितली जाते लाच - अविराज माने यांचा आरोप
महाराष्ट्र विकास सेनेचे राज्य सरचिटणीस अविराज माने यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन दिले आहे की इंदापूर तहसील कार्यालय पुरवठा विभागामध्ये रेशन कार्ड मध्ये कोणाचे नाव कमी करणे किंवा वाढवणे किंवा नवीन रेशन कार्ड काढणे किंवा कार्ड ऑनलाईन करणे किंवा कोणाला धान्य मिळत नसेल तर तरी लोक पुरवठा विभागामध्ये ये जा करत असतात अशा कामांसाठी तिथे अधिकारी वर्ग साहेब यांनी सांगितले आहे म्हणून प्रत्येक कामासाठी १०० रुपये किंवा २०० किंवा ५०० रुपयाची मागणी करत असतात अशा अधिकाऱ्यांचा त्रास इंदापूर तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला भोगावा लागत आहे, सर्वसामान्य लोकांनी याची तोंडी तक्रार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केले असता पुरवठा शाखेमधील मागितली जाणारी लाच ही तात्पुरते थोड्या वेळ बंद राहते नंतरच तास दोन तासाने परत चालू होते अशा तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. तरी आपण या प्रकरणाची एक त्रयस्त समिती नेमून सखोल चौकशी करून दोशी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावरती निलंबनाची ची कारवाई करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दिनांक 5 ऑगस्ट 24 रोजी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राज्य सरचिटणीस अविराज माने आणि इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत शिंदे यांनी दिला आहे
0 टिप्पण्या