महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मागणीला यश..

महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मागणीला यश..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद मधून दिले आदेश..

सर्वसामान्य ग्राहकांना - स्मार्ट / प्रीपेड मीटर नाही..
आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने दिनांक २८/०६/२४ रोजी म.रा. वि. वि कंपनी इंदापूर यांचा मार्फत ऊर्जामंत्री यांना निवेदन दिले होते की
महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणारा असे जाहीर केले आहे तसेच हे मीटर्स कंपनीचा खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे या संबंधातील टेंडर्स मंजूर करण्यात आलेले आहेत सध्या सर्वत्र मीटर लावण्याची मोहीम सुरू आहे असे स्पष्ट दिसून येत आहे वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाहीत
 
१) वीज कायदा २००३ मधील अधिनियम क्रमांक ४७ (५) अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र व मीटरची निवड करायचे सर्व कायदेशीर हक्क संबंधित ग्राहकांना आहेत कंपनी अघोषित सक्ती करून ग्राहकांच्या या हक्काच्या व कायदेशीर तरतुदीचे संपूर्णपणे उल्लंघन करीत आहे हे आम्हाला मान्य नाही त्यामुळे ग्राहक म्हणून आमच्या हक्का नुसार आमचा सध्याचा आहे तोच पोस्टपेड मीटर पुढेही कायमचा ठेवण्यात यावा अशी मागणी आम्ही करीत आहोत.

२) महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या टेंडर्स नुसार मीटरचा खर्च १२०००/ रु प्रति मीटर याप्रमाणे आहे प्रीपेड मीटर साठी केंद्र सरकारचे प्रति मीटर ९००/ रु अनुदान वगळता प्रत्येक ग्राहकामागे कमीत कमी १११०० / रु प्रति मीटर खर्च कर्ज काढून केला जाणार आहे या कर्जास आमची मान्यता नाही व आम्ही हा मीटर घेणार नाही त्यामुळे हा खर्च आमच्यावरती लादता येणार नाही याकरतामुळे ह्या कर्जावरील व्याज घसारा संबंधित खर्च ई .. कारणासाठी वीज दरामध्ये वाढ होणार आहे ही वाढ अंदाजे किमान ३० पैसे प्रति युनिट व अधिक होईल आम्ही हा मीटर वापरणार नसल्यामुळे वाढीव दराचा कोणताही बोजा आमच्यावर लावता येणार नाही याची नोंद घ्यावी कृपया आमच्या वरील मागण्यांची नोंद घ्यावी आणि याबाबत पुढील कार्यवाही तातडीने करावे ही विनंती शक्तीने असे मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आशा सक्तीचा जोडणीला प्रकर विरोध करू व भविष्यात महाराष्ट्र विकास सेना या पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर जनआंदोलन उभारू याचे नोंद घ्यावी ही विनंती असे निवेदन महाराष्ट्र विकास सेनेचे राज्य सरचिटणीस अविराज माने व इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत शिंदे यांनी दिले होते

चौकट 

सर्व सामान्य लोकहिता साठी आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून ऊर्जामंत्री यांचा पर्यंत आवाज उठवला व आमच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रतिसाद दिला व स्मार्ट / प्रीपेड मीटर महाराष्ट्रात सर्वसामान्य ग्राहकांना नाही अधिकारी वर्गाला असा आदेश दिला.. आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो 
आपला 
अविराज माने 
महाराष्ट्र विकास सेना 
राज्य सरचिटणीस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या