महाराष्ट्र राज्यात त्रिदल सैनिक परिवर्तन आघाडीची स्थापना करण्यात आली.शहाजी पवार

महाराष्ट्र राज्यात त्रिदल सैनिक परिवर्तन आघाडीची स्थापना करण्यात आली.शहाजी पवार

प्रतिनिधी -शिरूर 
महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या विधानसभेत प्रश्न लक्षवेधी करण्यासाठी विधानसभेत सैनिकांचा आमदार गेलाच पाहिजे.यासाठी महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार व सर्व संघटना एकत्र येवून आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यात त्रिदल सैनिक परिवर्तन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.या आघाडीत प्रत्येक जिल्ह्यातील दोन संचालक राहणार आहेत.सन २०२४ ला विधानसभा महाराष्ट्र राज्यातून फक्त नि फक्त तीन ते चार लागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्यात फौजी जनता पार्टी,सैनिक समाज पार्टी,भारतीय जवान किसान पार्टी,वीरोंकी वीर पार्टी अशा अनेक सैनिकांचे राजकीय पक्ष असून कोणीच एकत्र येण्यास तयार नाही.हे सर्व पक्ष महाराष्ट्र राज्यात २८८ जागा लढविण्यासाठी तयार आहेत.हे आपसामध्ये युती करण्यास तयार नाहीत.या सर्व पक्ष प्रमुख यांच्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार एकत्र येण्यास तयार नाही.या सैनिक राजकीय पक्षाने लोकसभेला निवडणूक लढवली होती.त्याचा निकाल आपल्यासमोर होता व काही लोकांनी भामट्यापणा करून लोकसभेला फाॅर्म भरला व स्टंटबाजी करून सैनिक व सैनिक परिवाराची दिशाभूल करून फाॅर्म का माघार घेतला?हा सर्व प्रकार महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराच्या लक्षात आला आहे. हे पाहता विधानसभेला जर आपण याच पध्दतीने एकत्र न येता निवडणूका लढविल्या तर काय होणार यासाठी भविष्यात महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार व सैनिक संघटना कोणत्याही सैनिक राजकीय पक्षासोबत जाणार नाहीत.जे सैनिक राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत.यांनी आजपर्यंत सैनिक व सैनिक परिवारासाठी काय योगदान दिले व त्यांची पाश्वभूमी पाहता महाराष्ट्र राज्यातील सैनिक संघटनांकडून अनेक सैनिक व सैनिक परिवाराच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत.तरी महाराष्ट्र राज्यातील नव्वद टक्के सैनिक व सैनिक परिवार व सैनिक संघटना एकत्र आल्या आहेत.तरी महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील ७२ संचालक मंडळाची त्रिदल सैनिक परिवर्तन आघाडीमध्ये निवड करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवाराची दिशाभूल व फसवणूक थांबविण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक हा सैनिक राजकीय पक्षासोबत जाणार नाही.त्याचे कारण असे आहे की,फौजी जनता पार्टी,सैनिक समाज पार्टी,भारतीय जवान किसान पार्टी,वीरोंकी वीर पार्टी,अशा सैनिकांच्या अनेक राजकीय पक्ष आहेत.यांनी जर सर्व सैनिक राजकीय पक्षाने जर युती केली तर महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार व सर्व सैनिक संघटना आपल्या पाठीशी राहतील अन्यथा युती न केल्यास महाराष्ट्र राज्यातील सैनिक व सैनिक परिवार व सैनिक संघटना आपल्या सोबत येणार नाही.त्यासाठी महाराष्ट्र राज्यात सैनिक व सैनिक परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व विधानसभेत सैनिकांचा प्रश्न लक्षवेधी करण्यासाठी सन २०२४ ला विधानसभेत सैनिकांचा आमदार पाठविण्यासाठी महाराष्ट्र राज्यात त्रिदल सैनिक परिवर्तन आघाडीची घोषणा करण्यात आलेली आहे.येत्या दोन दिवसात महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील ७२ संचालक मंडळाची निवड करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्यातील सैनिक राजकीय पक्षाने एकत्र येण्याचे आव्हान त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा.श्री.शहाजी पवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या