मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यातील सरकारी अधिकारी व प्रशासन यांच्यावर वचक नसल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्षांकडून केला जात आहे. आणि त्यातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील काही दिवसापासून राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, परंतु राज्य सरकारने अशी कोणतीही यादी प्रसिद्ध केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची ही यादी नेमकी कोणी बाहेर केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे परंतु यावर मुख्यमंत्र्यांची सही नाही मुख्यमंत्र्यांची सही होण्यापूर्वीच कोणी तरी ही यादी सोशल मीडियावर वायरल केल्याची चर्चा आहे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले राज्य सरकारकडून बदल्यांची कोणतेही जाहीर करण्यात आलेले नाही किंवा तसा प्रस्ताव कोणताही नव्हता. कोणीतरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने ही यादी सोशल मीडियावर वायरल केले आहे सहा महिन्यापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
0 टिप्पण्या