राज्यातील शाळा किती दिवस बंद राहणार.. आरोग्य मंत्री यांनी दिले संकेत....



करोना चे वाढते संकट पाहून महाविकास आघाडी सरकारने राज्यातील निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला.त्याच्यामध्ये दिवसा जमावबंदी, रात्री संचार बंदी केली. जाहीर केलेल्या नियमावलीत अनेक गोष्टी बंद केल्या,त्यात शाळांचाही समावेश होता.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे फेब्रुवारी पर्यंत राज्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाही.कोरोना संसर्ग कमी करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्यातील कोरोणाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे शाळा आणखी १५ ते २० दिवस बंदच राहणार आहेत. गेल्या दोन दिवसात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी करोणाचा संसर्ग कमी होतोय असे समजू नये.मुंबई-पुण्यात करोणा पॉझिटिव्हिटीची संख्या वाढत आहे. त्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की राज्यातील कोरोणा रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होत आहेत.जानेवारीत मृत्युदर ०.३% टक्के असल्याचे ते म्हणाले.
पूर्वी लसीकरणाचे प्रमाण हे ९ ते १० लाख होते परंतु सध्या ते घट होऊन ६.५ लाख आहे. याच्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. हे प्रमाण घटल्यामुळे कडक पावले उचलावी लागतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या