के के पाटलांना माळशिरस विधानसभेसाठी मातंग,बौद्ध,होलार समाजाची एलर्जी का?

के के पाटलांना माळशिरस विधानसभेसाठी मातंग,बौद्ध,होलार समाजाची एलर्जी का? 

माळशिरस तालुक्याच्या विधानसभेसाठी के के पाटील यांनी कुणाची मक्तेदारी तर घेतली नाही ना?

प्रतिनिधी सचिन रणदिवे 
मो नं 9730093611
माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा एसी प्रवर्गासाठी राखीव असून 2019 च्या निवडणुकीमध्ये बीडचे जिल्ह्यातील रहिवासी असलेले माळशिरस विधानसभेचे विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते यांना केके पाटलांनीच आयात करून भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून निवडणूक लढवण्याची संधी दिली होती परंतु राजकीय दृष्ट्या माळशिरस तालुक्यामध्ये उलथा पालथ झाल्यामुळे आमदार रामभाऊ सातपुते हे आगामी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार नसल्याची चर्चा माळशिरस तालुक्यात जोर धरू लागली आहे आमदार रामभाऊ सातपुते यांनी माळशिरस तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आणून माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामे केली आहेत परंतु माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते-पाटील गट व उत्तमराव जानकर गट एकत्र आल्याने आमदार रामभाऊ सातपुते हे या निवडणुकीला सामोरे जाणार नसल्याचे संकेत दिसून येत आहेत? याच पार्श्वभूमीवर जुलै महिन्यापासून माळशिरस तालुक्यामध्ये भुषण कांबळे हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे दिसून येत आहे व ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक असल्याचे दिसून येत आहे? भूषण कांबळे हे मुळ धाराशिव जिल्ह्यातील असुन त्यांना देखील आयात करण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने के के पाटील करत असल्याची चर्चा माळशिरस तालुक्यातील मातंग,बौद्ध,होलार समाजातील लोकांमधून बोलली जात आहे?

 ज्यावेळी के के पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य होत्या व के के पाटील पंधरा वर्षे पंचायत समिती सदस्य होते त्यावेळी त्यांना मातंग, बौद्ध, होलार लोकांनी मत दिली नसावीत म्हणून तर के के पाटील हे माळशिरस तालुक्यातील मातंग,बौद्ध, होलार समाजातील लोकांना माळशिरस विधानसभेसाठी जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न करत नाहीत ना असा संतप्त सवाल मातंग,बौद्ध व होलार समाजातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील मातंग,बौद्ध व होलार समाजाच्या लोकांच्या रोशाला के के पाटील यांना सामोरे जावे लागणार का ? माळशिरस तालुक्यातील मातंग बौद्ध व होलार समाजातील लोकांची के के पाटील यांना एलर्जी का व कशासाठी किंवा के के पाटील यांनी कुणाची मक्तेदारी तर घेतली नाही ना असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे? नेमकी मक्तेदारी कोणाची घेतली व कशासाठी घेतली हे देखील येणाऱ्या काळामध्ये मातंग,बौद्ध व होलार समाजातील लोकं के के पाटलांना दाखवून देईल? त्यामुळे के के पाटील यांना माळशिरस तालुक्यातील मातंग,बौद्ध व होलार समाजातील लोकांच्या रोशाला नक्कीच सामोरे जावे लागेल हे मात्र नक्की अशी चर्चा माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मातंग,बौद्ध व होलार समाजातील नागरिकांमधून सुरू असल्याचे दिसून येत आहे?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या