तात्याबा बळी पांढरमिसे यांचे 106 व्या वर्षी दुःखद निधन.....!
रुई थोरातवाडी, बाबीर नगरी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पांढरमिसे परिवारातील कुटुंबाचा प्रमुख आधारस्तंभ तात्याबा बळी पांढरमिसे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 106 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले बुवाजी पांढमिसे, सखाराम पांढर मिसे, सर्जेराव पांढर मिसे, दाजी पांढमिसे व एक मुलगी नर्मदा थोरात आहेत. सुना, नातू, नाती, पणतू पणती असा मोठा परिवार आहे. रुई पंचक्रोशीतील 26 सदस्य असणारे सर्वात मोठे एकत्र कुटुंब असणाऱ्या कुटूंबाचा आधारस्तंभ हरपला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिवार पंचक्रोशीला दुःख झाले.त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.पांढरमिसे परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. ते डॉ. प्रकाश पांढरमिसे व थोरातवाडी, रुईचे पोलीस पाटील नानासाहेब थोरात यांचे आजोबा आहेत.
0 टिप्पण्या