MST न्यूज नेटवर्क
दौंड
१५ मार्च रोजी बिबिसी कँनलला पाणी न सोडल्यास जलसमाधी घेणार असे त्रिदल महिला शक्ती आघाडीच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा भारतीताई लगड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,बि बि सी कॅनॉल मौजे गाडेवाडी (गाडेवाडी, शिंगाडेवाडी, खोमणेवस्ती साळुंके वस्ती ता.दौंड येथे पिण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी सोडण्यासाठी तहसिल कार्यालया समोर सोमवार दिनांक ०५/०३/२०२५ रोजी अमरण उपोषण चालू होते. त्या दरम्यान मा.उपविभागीय अभियंता शंकर बनकर यांनी दिनांक ०८/०३/२०२५ रोजी ठिक दुपारी ०३:०० लेखी पत्र दिल्याने उपोषण सोडण्यात आले होते.
तसेच उपविभागीय अभियंता, खडकवासला उपविभाग क्र.१ दौंड पत्र जा. क्र. ख.पा.उ.अ वि क्र.-१८ दौड / प्रशा/२५९/ सन २०२५ दिनांक :- ०८/०३/२००५ रोजी. पाणी सोडण्याबाबत लेखी पत्र दिलेले आहे.दिनांक १५ मार्च २०२५ ला ठिक १०:०० वाजता १०० क्युसेस ने पाणी सोडले नाही तर १५ मार्च २०२५ ला ठिक ११:०० वाजता मळद ता.दौंड येथे इंदापूरला जाणाऱ्या पाण्याच्या कॅनॉलमध्ये जलसमाधी घेण्यात येणार आहे.
असे निवेदन उपविभागीय अभियंता खडकवासला पाटबंधारे उपविभाग क्र.-१ दौंड यांना भारतीताई लगड यांनी दिले आहे.
जलसमाधी घेतल्यानंतर याला जबाबदार फक्त नि फक्त उपविभागीय अभियंता श्री शंकर बनकर हेच राहतील,असे देखील दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
तसेच याची खबरदारी शासन व प्रशासनाने घ्यावी या जलसमाधी घेण्याच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील असे भारतीताई लगड शेवटी म्हणाल्या.
याबाबत उपअभियंता शंकर बनकर यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
0 टिप्पण्या