महापुरुषांची चरित्रे वाचा जग बदलण्याचं सामर्थ्य निर्माण होईल "-प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे
धालेवाडी
पुरंदर वार्ताहर,
जेजुरी येथील अत्रे ग्रामविकास प्रतिष्ठानचे, श्री शरदचंद्रजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिर मौजे धालेवाडी, पुरंदर येथे दि. 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आले आहे. "महापुरुषांचे विचार आणि आजचा युवक" या विषयावरती प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते म्हणाले, मित्रांनो, मिनिटा मिनिटाला अन् तासा तासाला स्टेटस बदलून आयुष्याचं स्टेटस नाही बदलत. स्टेटस बदलण्यासाठी आयुष्यात खडतर कष्ट अन् खडतर अभ्यासच करावा लागतो. त्याच्याशिवाय स्टेट्स नाही बदलत.असे स्टेटस अनेक कर्तबगार महापुरुषांनी आपल्या समाजोपयोगी कार्यातून निर्माण केलं. यामध्ये अग्रक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिसूर्य म. फुले, राज्यर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशा अनेक महापुरुषांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने स्टेटस निर्माण केले.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्व व कर्तबगारीच्या जोरावरती अठरा पगड जातीधर्मीयांच्या सहकार्याने निर्माण केलेलं देखणं स्वराज्य.आजही जगभरातील अनेक अभ्यासक व संशोधकांना भुरळ पडते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाने त्यांचं स्टेटस जगभरात ठेवले जाते. शिवजयंती जगभरात निर्माण केली जाते.हा जगतातील महान अशा आदर्शवत राजाचा आदर्श आजच्या तरुणाईने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रृत व विवेकी बनतो.
शिक्षण हे साध्य नाही, साधन आहे. क्रांतिसूर्य म. फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाबरोबरच समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण तत्कालीन विद्यार्थ्यांना दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील अनेक राज्यघटनांचा अभ्यास करून भारताचे संविधान निर्माण केलं. 32 डिगऱ्या घेऊन ज्ञानाच्या क्षेत्रात एक वेगळा उचँक केला. यासाठी प्रचंढ वाचन करून तरुणाईला "वाचाल तर वाचाल" हा ज्ञान वाचनाचा संदेश दिला.याचा आदर्श आजच्या तरुणाईने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.तरुणाईने रात्र रात्र जागून मोबाईलवरती दीड आणि दोन जीबी इंटरनेट खर्ची करण्याचा नादात आयुष्याचा जीबी तर खर्च होत नाही ना. याकडे गांभीर्याने पाहून मोबाईलच्या विळख्यातून सुटका करून घेतली पाहिजे. मोबाईल, व्हाट्सअप वर याचे त्याचे स्टेटस ठेवून कधीच स्वतःचं स्टेटस निर्माण होत नसतं. खडतर अभ्यास करून असं स्वतःचं स्टेट्स निर्माण करा कि, अनेकांना ते कॉपी करण्याचं आकर्षण निर्माण झालं पाहिजे. असं कर्तृत्वाने स्टेटस निर्माण करा.महापुरुषांची चरित्रे वाचा जग बदलण्याचं सामर्थ्य निर्माण होऊ शकेल असे आव्हान प्राचार्य डॉ.प्रकाश पांढरमिसे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अरुण कोळेकर यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले,आजच्या तरुणाईने मोबाईल पासून दूर राहावे. त्याचा अभ्यासा पुरता वापर करायला हवा.मोबाईल पाहण्याचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. महापुरुषांनी घालून दिलेल्या आदर्श व संस्कारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आदर्शवत कार्य केले पाहिजे असे आव्हान डॉ. अरुण कोळेकर यांनी विध्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्यार्थीनी रोशनी पवार हिने केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.चंद्रशेखर काळे यांनी केले.आभार भूमिका पांचाळ हिने केले यावेळी प्रा. नेत्राली काकडे मॅडम, प्रा. गणेश पांढरे सर विध्यार्थी, प्राध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या