खुले आम वाळु तस्करी.....! तहसिलदार कार्यालयाची साथ कि पुढा-यांचा हाथ ......?





तहसिलदार कार्यालयाची साथ कि पुढा-यांचा हाथ ......?
पैशासाठी काय पण हा धर्म बनवना-या लाजखोरांनमुळे  तालुक्याची इज्जत धोक्यात आली आहे.तरी सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे तालुक्यात खुले आम वाळु तस्करी डोर्लेवाडी व मेखळी हद्दीत होत आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ (१) गौणखनिज अधिनियम महाराष्ट्र जमिनीवर किंवा जमिनीखाली असलेल्या खाणी, दगडाच्या खाणी, नाले, खाड्या, नदीची पाने इत्यादी ठिकाणी सापडणा-या खनिजावरील सरकारचा हक्क स्पष्टपणे राखून ठेवण्यात आला आहे अधिका-यांना कळवून सुध्दा बारामतीचे  महसूल अधिकारी गौण खनिज माफियांवर ठोस कारवाई करतच नाहीत.शासनाने वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यावर आळा घालण्याबाबत अधिनियम , १ ९ ८१ [ सन २०१६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५ , दिनांक २ ९ जानेवारी , २०१६ ] आहे पण तरी सुद्धा शासन निर्णय धुळ खात पडला आहे .गौण खनिज तस्करी बाबत मुद्दा सामाजिक कार्यकर्ताने उचला तर त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे व धमक्या देण्याचे सत्र लगेच चालू होते.कायद्याला बापाची जहा गिरी समजणा-या तालुक्यातील गौण खनिज तस्करी करणाऱ्या विरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी बारामती यांनी केले आहे . प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये वाळु माफीयांवर मोका गुन्हा दाखल करण्या संदर्भात ठराव करण्यात बाबत गट विकास अधिकारी बारामती यांनी कळविले आहे तरी सुद्धा बारामती तालुक्यातील गौण खनिज चोरांचा बंदोबस्त का लागत नाही.? हा एक मोठा प्रश्न आहे.गौण खनिजाचा बेकायदा उपसा व चोरी होत असल्यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागत आहे. सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल कोण गोळा करत आहे,पॉकेट नेमकं कुणाला सांगणार कोण ..?
डोर्लेवाडी परिसरातील गट नंबर . १३३ अवैधरित्या वाळू साठा आढळून आला असता , गाव कामगार तलाठी पारवे हे रजेवर, असल्यामुळे डोर्लेवाडीचे  कोतवाल माऊली मदने यांना  संपर्क साधुन मंडल अधिकारी यांच्याशी संपर्क करून त्याला जागेची पाहणी करण्यास सांगितले असता , कोतवाल यानो पाहणी केली असता , डोर्लेवाडी गट नं . १३३ मध्ये पोपट बापु जाधव ‌याच्या जमीनी मध्ये अवैधरित्या अंदाजे १२ ते १५ ब्रास वाळू साठा आढळून आला . असे असताना तलाठी रजेवर असल्याचे सांगत सोमवारी पंचनामा करण्याचे सांगितले . मात्र अशा परिस्थितीत वाळू साठा चोरीस गेला तर बारामती तहसीलदार विजय पाटील हे  कुणाला जबाबदार धरणार .....? 
तसेच गौण खनिज संवर्धन समितीचे बारामती मध्ये  काय झाले असा प्रश्न जन सामान्य नागरिकांना पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या