बारामती शहरामधील खून प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना अटक....सोशल मीडियामध्ये प्रसिद्धी व आपली वचक व्हावी भविष्यात त्या ठिकाणी दबदबा निर्माण करण्यासाठी.....!
बारामती
बारामतीत काल संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान श्रीरामनगर कवि मोरोपंत शाळेनजिक तीन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यामध्ये शशिकांत बाबासाहेब कारंडे (वय 47, रा. बारामती) यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या २४ तासांच्या आत आरोपींना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले आहे.अवघ्या सोळा वर्षांच्या तीन मुलांनी दोन कोयते व कु-हाडीने तब्बल अठरा वार करत शशिकांत यांची निर्घृण हत्या केली. याबाबत बारामती शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 379 /22 कलम भादवी 302 34 भारतीय हत्यार कायदा कलम 4 25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद केला.
या तिघांनीही यापूर्वी शशिकांत कारंडे यांचा मुलगा शेखर याच्यावर प्रेमात अडथळा आणत असल्याच्या संशयावरून वार केले होते. याबाबत कारंडे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या तिघांना अटकही झाली होती. प्रेमप्रकरण आणि त्यातून झालेल्या तुरुंगवासामुळे या तिघांनीही कारंडे कुटुंबीयांना लक्ष्य केले होते. त्यातूनच गुरुवारी शशिकांत कारंडे यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला.
गणेश याने फिर्यादी यांच्या मुलावर मे महिन्यात हल्ला केला होता त्यावेळेस गणेश व त्याचा दुसरा साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते व बाल न्यायालयापुढे हजर केले होते.गणेश याच्या पालकांनी त्याला नंतर बालन्यायालयातून सोडून आणले होते. वरील ताब्यात घेतलेले तीनही अल्पवयीन मुले एकमेकांचे दोस्त असून सोशल मीडिया द्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत. मयत व्यक्तीचा मुलगा व तिन्ही आरोपी पूर्वी एकाच शाळेत शिकलेली व एकमेकांचे मित्र होते .परंतु मुलींच्या मैत्रीवरून त्यांच्यात वाद झाला प्रेमामध्ये अडथळा निर्माण करतो आहे. त्यास मयत हे सुद्धा पाठीशी घालत आहेत असाही गैरसमज करून घेतला. याचा राग त्यांना होता.सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध होण्याची त्यांना हौस होती व श्रीराम नगर भागात त्यांचा वचक व्हावा असे कृत्य करावे व भविष्यात त्या ठिकाणी दबदबा निर्माण करावा असे सुद्धा एकंदरीत त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरून दिसून येते याच कारणास्तव त्यांनी शशिकांत कारंडे यांचा भर वस्तीत भर दिवसा खून केला असे निष्पन्न होत आहे.
मयत काल त्यांच्या मुलीला घेण्यासाठी शाळेमध्ये आलेले होते त्या मुलीचा या घटनेची काहीही संबंध नाही ती फक्त या गुन्ह्यातील. प्रत्यक्षदर्शी घटना पाहणारी साक्षीदार आहे. सदर गुन्ह्याचा तपास करून सदर विधी संघर्ष ग्रस्त बालकांना ताबडतोब ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलिसांना दिले होते तसेच अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे तपासामध्ये शहर पोलीस ठाण्यात हजर होते.
वरील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर , तुषार चव्हाण , बंडू कोठे यांनी वेगवेगळ्या टीम तयार करून शोध घेऊन त्यांना आज सायंकाळी ताब्यात घेतले आहे.
0 टिप्पण्या