शेतकरी सभेत कृषिदूतांनी दिली ‘मृदा आरोग्य पत्रिकेची’ सविस्तर माहिती

शेतकरी सभेत कृषिदूतांनी दिली ‘मृदा आरोग्य पत्रिकेची’ सविस्तर माहिती
डॉ. शरदचंद्र पवार कृषि महाविद्यालय , बारामतीच्या विद्यार्थ्यांनी पिठेवाडी गावातील शेतकरी सभेत ‘मृदा आरोग्य पत्रिका’ याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांमध्ये मृदा आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. कृषि दूतांनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे जमिनीचे पोषण आणि त्यातील पोषक तत्वांची स्थिती दर्शवणारा अहवाल असल्याचे समजावून सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, यामुळे जमिनीच्या पोषणाची योग्य माहिती मिळते आणि त्यानुसार पीक उत्पादन वाढवता येते. कृषि दूतांनी शेतकऱ्यांना मृदा परीक्षणाची प्रक्रिया सोप्या भाषेत समजावली. “मृदा नमुने कसे घ्यायचे, त्यांचे प्रयोगशाळेत परीक्षण कसे होते, आणि त्यावर आधारित रिपोर्ट कसा तयार होतो,” याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.सभेच्या शेवटी, कृषि दूतांनी शेतकऱ्यांच्या शंका समजून घेतल्या आणि त्यांच्या शंकांचे समाधानकारक उत्तर दिले. काही शेतकऱ्यांनी जमिनीच्या पोषणाबाबत असलेल्या गैरसमजांबद्दल चर्चा केली. कृषि दूतांनी त्यांच्या अडचणींवर उपाय सुचवत मृदा आरोग्य राखण्यासाठी जैविक खतांचा उपयोग कसा करावा, हे सांगितले. शेतकऱ्यांनी कृषि दूतांच्या सादरीकरणाची प्रशंसा केली आणि या माहितीमुळे मृदा आरोग्य जपण्याबाबत त्यांना नवी दिशा मिळाल्याचे सांगितले. गावाच्या सरपंच Samadhan jaankar yani कृषि dutancha ज्ञानाला आणि प्रयत्नांना दाद देत, “अशा उपक्रमांमुळे शेतीत प्रगती होईल,” असे मत व्यक्त केले. बारामती कृषी महाविद्यालयाच्ये सुपेकर आदित्य, संदेश शेळके, महेश तोडकर, अथर्व तुरेवाले, रोहन शिंदे, श्रीनिवास इन्नल्ला, हिमांशू टिकोने, मोडक मोहम्मद हे कृषीदुत ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत तीन महिने पिठेवाडी येथे मुक्कामी आहेत.या कृषीदुतांना संस्थेचे मुख्याधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड व एस. व्ही. बुरुंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी गावचे सरपंच पप्पू बापू जानकर, उपसरपंच वैभव व्हनखडे, कृषीसेवक अंजली जगताप, महादेव जानकर, नवनाथ मदने व मोठ्या संख्येने प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. ही शेतकरी सभा हा ग्रामीणयावेळी गावचे सरपंच पप्पू बापू जानकर, उपसरपंच वैभव व्हनखडे, कृषीसेवक अंजली जगताप, महादेव जानकर, नवनाथ मदने व मोठ्या संख्येने प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. भागातील शेती शिक्षणाला चालना देणारा एक आदर्श उपक्रम ठरला आहे. कृषि दूतांच्या प्रयत्नांनी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या